Wednesday, November 18, 2009

वाहत्या या वाऱ्याला,,,,
कधीच थांबवायचं नसतं....
मनातील दुखांना मात्र,,,
नेहमीच आवरायचं असतं....

समुद्राच्या लाटांना,,,,
कधीच अडवायचं नसतं....
नयनांच्या आसवांना मात्र,,,
पापण्यातच थांबवायचं असतं.....

फुलाच्या गंधाला कधीच,,,
दरवळल्यावाचून ठेवायचं नसतं.....
तुझ्या आठवणींच्या गंधाला मात्र,,,
मनातच जखडायच असतं......

इंद्र-धनुच्या रंगांना,,,,
इकडे-तिकडे पसरवायच नसतं....
आयुष्यातील प्रत्येक रंग,,,,
जरी बिखरलेलं असतं..........

पक्ष्यांच्या मंजुळ स्वरांना,,,
गप्प करायचं नसतं.....
मनातील इच्छांना मात्र,,,
ऐकून सोडायचं असतं.....

पंखांच्या भरारीला,,,,
कधीच कापायचं नसतं....
आपल्या मिलनाच्या स्वप्नाला मात्र,,,,
डोळ्यातच दाबायचं असतं....

का वेडं मन असं,,,,
इच्छा बाळगत असतं......
तू येणार नाहीस हे जसं,,,,,
त्याला ठाऊकच नसतं..............

चिंब पावसात भिजताना !!!!
Labels: पाऊस 0 comments
चिंब पावसात भिजत होते........
भिजताना क्षण क्षण
तुलाच आठवत होते....
तू येणार नाहीस हे,
मन जानातही होते.....
तरीही नयनांचे मन,
तुलाच शोधत होते....
चिंब पावसात भिजताना,
एक मात्र बरे असते...
तुझ्या आठवणीतल्या आसवांना,
कोणीच ओळखत नसते....
चिंब चिंब भिजताना,
तुझी सोबत हवी-हवीशी वाटते...
तुझ्या शिवाय जगताना,
मला जगणेच उमगत नसते....

वाट
on गुरुवार २९ ऑक्टोबर २००९
Labels: तू, वाट 0 comments
तू नाहीस तरी आठवणी तुझ्या आहेत अजुनही
फूल केव्हाच सुकून गेलय.....
परंतु गंध ओला आहे अजुनही
वादळ कधीच शांत झालय.....
तरी वारा वाहतो आहे अजुनही
वाट बदलली मी तरी.....
पाउलखुणा दिसतात तुझ्या अजुनही
रानातून एकटे फिरताना.....
साथीला आवाज
रंग सारे संपले माझे तरी.....
अधूरे आहे चित्र अजुनही
दिलास तू आकार मजला.....
निर्विकार मी अजुनही
फोटो तुझा पाहूनहीं.....
काहूरमनी उठते अजुनही
तू परतणार नाहीस हे माहित असुनही.....
वाट तुझी पहाते मी अजुनही
वाट तुझी पहाते मी अजुनही ......!!

No comments:

Post a Comment